भंडारा पत्रिका/वार्ताहर जवाहरनगर : सावरी जवाहरनगर येथील ग्रामपंचायती अंतर्गत नागरी सुविधा योजनेतून करण्यात आलेल्या विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. अवघ्या महिन्याभरातच रस्त्यावर लावलेले गट्ट उखडल्याने नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली असून, या भ्रष्ट कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. सावरी जवाहरनगर येथील ग्रामपंचायतीने रा. नागरी सुविधा योजनेंतर्गत १० लाख रुपये खर्च करून हनुमान मंदिर परिसरातील मुख्य चौकात काँक्रिट रस्त्यावर नव्याने गट्टू बसवण्याचे काम हाती घेतले होते. हे काम मागील महिन्यातच पूर्णकरण्यात आले होते. मात्र, कामाला आठवडा पूर्ण होत नाही तोच रस्त्यावरील गट्टू बाहेर निघायला सुरुवात झाली. याउखडलेल्या गट्टयांमुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाºया वाहनचालकांना आणि आठवडी बाजारात येणाºया नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.