भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याची भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतली आहे. याच मागणीला बळ देण्यासाठी ०३ आॅगस्ट पासून ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली असून या यात्रेचा शुभारंभ त्रिमुती चौक भंडारा येथून करण्यात आले या वेळी यात्रेचे स्वागत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडाºयातील कवडसी फाटा व पेट्रोलपंप ठाणा येथे भव्य स्वागत करण्यात आले. विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. आज ३ आॅगस्ट ते ९ आॅगस्ट अशी यात्रा राहणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी ओबीसी चे नेते विजय वडेट्टीवार व ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम उपस्थित होते त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.राज्यभर ओबीसी समाजाला एकत्र आणत जातनिहाय जनगणनेच्या मागणीला अधिक बळ देण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेचा शेवट ९ आॅगस्ट रोजी चंद्रपूर येथे होणार आहे. यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते,माधुरी साठवणे, योगिता धांडे, शामला कोहपरे, प्रमिला शहारे, पूजा पाटिल, कीर्ती भांडारकर, स्वप्नाली उके, भाऊ कातोरे, मनीषा भांडारकर,सुरेंद्र सार्वे, प्रवीण घारडे, विजय चवळे, सुखराम रेहपाडे, शेषराम देवगडे, पडोळे काका,स्नेहा मेश्राम, नम्रता बागडे,शाहील उके उपस्थित होते.