भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांचा विचार आणि आम्ही घेतलेल्या निर्णयासोबत एकरूप झालेले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पाच मुद्यांनी समजून घ्या आयोगाचा निर्णय ‘
या देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आमचं सरकार घटनेच्या आधारावर स्थापन झालं. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय मेरिटवर दिला आहे. हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. बहुमताचं सरकार या राज्यात स्थापन झालं आहे’, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.