भंडारा : शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी द्वारा संचालित सिद्ध साक्षी आनंद आश्रम किटाळी बरडकिन्ही, गिरोलाच्या वतीने होळी धुलीवंदनाच्या कार्यक्रम भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन, ग्रामीण परंपरेच्या वारसा जपण्यासाठी ‘घाणमाकड’ खेळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकनेते प्राचार्य होमराज पाटील कापगते, किताडी/बरडकिन्ही ग्रामपंचायतचे शिशुपाल सलामेसरपंच अरविंद पुस्तोडे, संस्थेचे सचिव मीरा कहालकर, सहसचिव रामदास कामठे, अध्यक्ष प्रेषिता कहालकर, संस्थापक डमदेव कहालकर, कवी पालिकचंद बिसने उपस्थित होते. पारंपारीक वारसा जोपासत आधुनिक दुनियेत हारवलेले लहानांचे घाणमाकड डमदेव कहालकर यांच्या पुढाकाराने जगापुढे आणलेयामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येवून कौतुक होत आहे.