भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी-उमरेड-क-हांडला या अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव पाच वर्षापासून रेंगाळत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना वन्यप्राण्यांच्या भितीतजीव धोक्यात घालून जगावे लागत आहे. त्यामुळे माजी खा.शिशुपाल पटले यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून पवनी तालुक्यातील पाऊणगाव, चिचखेडा, मुरमाडी व आवळगाव, धामणगाव, कवडसी, गायडोंगरी, जोगीखेडा, हिमेशा ह्या गावांचा पुनर्वसन करावे अशी मागणी केली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर गावांचे तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना राज्याचे सचिवांना दिल्या.