नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा- मुनगंटीवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकºयांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यांसदर्भात शेतकºयांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाºयांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *