भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : विदर्भात दोन दिवस पावसाचा यलो व आॅरेंज तर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट वेधशाळेने जाहीर केला आहे. विदर्भात वाºयाचा वेग ताशी ४० ते ५० किमी तर, उर्वरित राज्यात ३० ते ४० किमी राहील. मध्यप्रदेश व सभोवतालच्या परिसरावर ९०० मीटर उंचीवर गोलाकार वाºयांची स्थिती असून, ती महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा आणि वारा खंडितता प्रणाली कायम असल्याने पावसाचे वातावरण आहे. एप्रिल महिना तीवह्य उन्हाशिवाय गेल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने पुढील आठवड्यातील आपल्या अंदाजात देशात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत उष्णतेची लाट असते. पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या मध्य भागात पश्चिम विक्षोभाचा प्रभाव जाणवू शकतो. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत केरळ, तेलंगणमध्ये २७ एप्रिलला आणि अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात २८ एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, तेलंगणा, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे