विदर्भात ४८ तासांत मुसळधार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार असून पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात धुंवाधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळा सुरुवात झाली आहे. तसेच नागभीड तालुक्यात मुसळधार पावसाने पुलावर पाणी आले असून नागभीडउमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.

विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबईसह पुणे, नाशिक आणि उपराजधानी नागपुरातही सतत रिमझिम पाऊस होत असल्याने नागरिकांचीचांगलीच पंचाईत झाली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकºयांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. त्यातच आता आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *