जिल्ह्याच्या कानाकोपºयातून दिल्लीत नेली जाणार अमृत वाटिका निर्मितीसाठी माती- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. तसेच जिल्ह्यातील सर्व अमृत सरोवरावर प्रत्येकी ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत जिल्ह्याच्या कानाकोपºयातून दिल्लीत माती नेली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा सह आयुक्त (नपाप्र) करण चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

‘मेरी माटी मेरा देश’ हा भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाºया स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाला गोंदिया जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. याला सुद्धा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला. शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे, मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेचे प्रमुख घटक असल्याचे चिन्मय गोतमारे यांनी स्पष्ट केले. ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून यावषीर्ही ‘हर घर तिरंगा’ अभियान आयोजित केले जाईल असे त्यांनी सांगितले. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि ती जिल्ह्याच्या कानाकोपºयात नेण्यात माध्यमांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील.

वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विशेष आयोजनाच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. ९ ते ३० आॅगस्ट २०२३ दरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतिक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेत गोंदिया जिल्ह्यातील गावा-गावांमधून माती जमा करून ती दिल्ली येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (लोकसहभाग)https://merimaatimeradesh.gov.inहे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लोकं माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील. या कृतीतून लोकं भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारसाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाºयांप्रती आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्रणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतली जाईल. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड केले जाऊ शकते.

गेल्यावर्षी सर्वांच्या सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी झाला होता. यावर्षी देखील १३ ते १५ आॅगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकावू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून ‘हर घर तिरंगा’ संकेतस्थळावर अपलोड करू शकतात.(harghartiranga.com)या देशव्यापी मोहिमेचा तपशीलhttps://yuva.gov.in/meri_maati_mera_desh
या पोर्टलवर पाहता येईल. ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम ९ आॅगस्ट रोजी सुरू होईल आणि १५ आॅगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम १६ आॅगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. ३० आॅगस्ट २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे. तरी गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप देऊन या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *