भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: गेल्या काही दिवस- ांत नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० हून अधिक रुग्णांचे रुग्णालय व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे व औषधांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचे सर्वश्रुत आहे. असे असतानाही प्रशासकीय कर्मचाºयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. या करीता तपास यंत्रने मार्फत चौकसी करुन मृत रुग्णांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी शुक्रवार दि. ६ आॅक्टोबरला बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा कमेटीतर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री ला निवेदन देण्यात आले. बहुजन समाज पक्ष या घटनेचा निषेध करत असून ही दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. व तपासाच्या नावाखाली दडपशाही करू नये, तसेच तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर कडक कारवाई करून मृत रुग्णांच्या कुटुंबीयांना न्याय द्या अशी मागणी बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, शंकर भेंडारकर, जिल्हा अध्यक्ष पाम्बीर्द, कोषाध्यक्ष रवि गजभिये, यशवंत वैद्य, नरेन्द्र रामटेके, शुक्राचार्य डोंगरे उपस्थित होते.