मुंबई : दिल्लीतील संसदेच्या सुरक्षेतील ढिसाळ कारभार पाहता नागपुरातील विधानभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आता फक्त आमदारांनाच दोन व्हिजिटर पास मिळू शकतील. दिल्लीतील संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने सतर्क राहून सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना जास्तीत जास्त दोन व्हिजिटर पास देण्यात यावेत.