भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व संबंधीत यंत्रणा यांनी नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. सर्व सामान्य जनतेची कामे वेळेत होण्यासाठी शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्यामाध्यमातून जनतेची कामे काल मर्यादेत पुर्ण करावी त्यासाठी जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या बाबतीत निवासी उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांनी लेखी निर्देश जारी केले आहे.