कर्जापोटी शेतकºयाची आत्महत्या

भंडारा : थकीत कर्ज आणि नापिकीमुळे शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तर्री/मिन्सी येथे २५ आॅक्टोबर रोजी घडली. राजेंद्र वासुदेव शांतलवार (५५) रा. तिर्री/मिन्सी असे मृत शेतकºयाचे नाव आहे. शांतलवार यांच्यावर शेतीचे कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी २0२0 मध्ये एकूण शेतीपैकी दोन एकर शेती विकली होती. सध्या त्यांच्याकडे एक एकर शेती होती. मागील वर्षी शेती कसण्याकरीता त्यांनी सोसायटीमधून उर्च उचलले होते. पण ते कर्ज थकीत राहिले. तसेच यावर्षी शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. नापिकी आणि कर्जामुळे त्यांनी ग्रामपंचायतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *