भारत वि.आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यासाठी मेट्रोची विशेष सेवा

ांडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी ९ फेब्रुवारीपासून जामठा व्हीसीए स्टेडियमवर होणार असून तेथे प्रेक्षकांना जाता यावे म्हणून महामेट्रोने सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व मेट्रो सेवासुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या आॅटोमोटिव्ह, बर्डी, प्रजापतीनगर या स्थानकांहून प्रेक्षकांना न्यू एअरपोर्ट मेट्रो किंवा खापरी स्थानकापर्यंत जाता येईल. तेथून जामठापर्यंत पोहोचण्यासाठी इ-रिक्षाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारपासून पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सामना चालग आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत मेट्रोने क्रिकेटप्रेमींसाठीदर १५ मिनिटांनी व दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान दर १२ मिनिटांनी मेट्रोची सोय केली आहे. सामना संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना परत येण्यााठी दुपारी ३ ते ७ पर्यंत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या न्यू एअरपोर्ट व खापरी स्टेशनपासून व्हीसीएचे जामठा स्टेडियम अनुक्रमे ७ आणि ६ किमी अंतरावर आहे. या स्थानकांवरून जामठा येथे जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी ईरिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. क्रिकेटप्रेमींनी मेट्रोच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामेटे्रोने केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *