भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील टेकेपार डोडमाझरी येथील अनुभव कट्टा म्हणजेच युवकांचा मंच यांनी पर्यावरणाची होत असलेले हानी आणि दुष्परिणाम याचा विचार करून पर्यावरणपूरक होळी आणि धुलीवंदन साजरे करण्याचे संकल्प करून पर्यावरणाला वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करावे असा संदेश देत रंगविना रंगपंचमी संकल्पनेतून होळी आणि धुलीवंदन साजरी करावी असे आवाहन नागरिकांना देऊन देण्यात आले व पर्यावरणासाठी जागृत राहावे असे विचार अनुभव कट्टा लोकांसमोर मांडत आहे. याप्रसंगी अनुभव शिक्षा केंद्र साथी आकाश रामटेके, अभिनव मेश्राम, विश्वजीत रंगारी, प्रबुद्ध रामटेके, सागर मेश्राम, रक्षित रामटेके, आयुष्य हुमने, श्रेयश रामटेके उपस्थित होते.