करडी ते मुंढरी रस्त्यावरील बाभुळ झाडांची सर्रास कत्तल

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्यांवर येत असलेल्या झाडाच्या फांद्या येत असल्याने वाहनांना अडथळा होऊ नये म्हणून बांधकाम विभाग मोहाडी अंतर्गत एखाद्या ठेकेदाराला कान्टैक्ट दिला आहे. परंतु तो ठेकेदार फांद्या न काटता सरळ बुडापासून किंवा मोठमोठे खांदे कापुन झाडांची कत्तलकेली जात आहे. पण कोणत्याही बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून लक्ष दिले जात नाही अशी तक्रार कुशारी येथील उपसरपंच शखील वामन आंबागडे यांनी वरीष्ठ अधिका-यांना तक्रारीत म्हटले आहे. महाराष्ट्र शासन म्हणतो की झाडे लावा आणि पाणी जिरवा असे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शासनाकडून मोहीम राबविले जाते आणि शासनाकडून झाडांची कत्तल केली जात असेल तर झाडे लावा पाणी जिरवा ही मोहीम कशासाठी? रस्त्याच्या कडेला झाडे असले तर उन्हाळ्यात येणा-या जाणा-या नागरीकांना झाडाखाली बसून काही वेळ थांबतात व शांती घेतात आणि अश्या परीस्थीतीत समजा सार्वजनिक बांधकाम विभागकडून अशी झाडांची कत्तल होत असेल तर याला जबाबदार कोण?हा प्रकार करडी-मुंढरी रस्त्यावर नाही तर संपूर्ण मोहाडी तालुक्यामध्ये होत आहे.

ज्या ठेकेदाराकडून झाडांची कत्तल केली जात असेल तर त्या ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभागकडून कारवाई करण्यात येत का नाही? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडून लक्ष देण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. याबाबत ठेकेदाराला फक्त रस्त्यावर येत असलेल्या फाद्यां कापण्याकरिता मंजुरी दिले आहे. समजा मोठे बुडापासून झाडे कापले असेल तर त्या ठेकेदारावर योग्य कारवाई केली जाईल, असे मोहाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भाऊदास पिपरीवार यांनी सांगितले. आता काय कार्यवाही करतात याकडे तक्रारदार कुशारी येथील उपसरपंच शखील वामन आंबागडे यांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *