खारघर मृत्यू प्रकरणात सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नवी मुंबईतील खारघर येथे १६ एप्रिल २०१३ रोजी आयोजित महाराष्टÑ भुषण पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी १५ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला.त्याला राज्यसरकार पुर्णपणे जबाबदार असुन सरकारविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भंडारा जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्यातवीने जिल्हा पोलीस अधिक्षक भंडारा यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. याप्रसंगी राकॉं जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, राकॉं प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यासह राष्टÑवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा न नोंदविल्यास संपुर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *