तिरोडा : तालुक्यातील सेलोटपार येथील गावातील नाल्यांना काही ठिकाणी अडथळे असून हे पाणी गावाबाहेर वाहून जात नसल्याने नागरिकांचे घरात जात असल्याने येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार येथील किराणा दुकानदार राजकुमार मलेवार यांनी खंड विकास अधिकारी पंचायत समिती तिरोडा यांना दिली आहे. राजकुमार मलेवार यांचे तक्रारीनुसार त्यांचे सेलोटपार येथील राहते घरी किराणा दुकान असून ते आपले परीवार व वृद्ध आई-वडीलानसह राहत असून गावातील नाल्यांना काही ठिकाणी अडथळे असल्याने हे घानेरडे पाणी गावा बाहेर वाहून न जाता माझे घरासह ईतर काही घरात शिरत असल्याने या घाणेरडे पाण्यामुळे डास व इतर जीव जंतू घरात जाऊन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येउन जिवीतासह धोकादायक आहे. तसेच त्यांच्या किरणा दुकानात येणारे ग्राहकांना अडचण येत असल्याने नुकसान होत असून त्यांच्या वृध्द आई, वडिलांना घराबाहेर निघने कठीण झाले आहे. या बाबत ग्रामपंचायत मधे तक्रार करुनही काहीही उपाययोजना होत नसल्याने त्वरित नाल्यांचे पाणी गावाबाहेर वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी लेखी तक्रार खंडविकास अधिकारी पंचायत समिती तिरोडा यांचेकडे केली आहे.