भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : तरुणीवरून झालेल्या वादात एका गुंडाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अभिनव उर्फ शांकी भोयर (२२) रा. बारसेनगर असे मृताचे नाव आहे. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याअंतर्गत बारसेनगरात घडली. अभिनव चहाच्या टपरीवर चहा पित असताना दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी अभिनववर चाकूने हल्ला चढविला. सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि फरार झाले. अतिरक्तस्त्रावाने अभिनवचा जागीचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मारेकºया विरूध्द गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे बारसेनगरात प्रचंड खळबळ उडाली. संशयित आरोपींमध्ये परिसरातच राहणारे कशिश महाजन (२३), साहिल महाजन आणि सोनू मासूरकर यांची नावे समोर आली ले आहेत. अभिनवचा एका तरुणीवरून कशिश याच्याशी वाद सुरू होता.
दोघांमध्ये शाब्दीक वाद आणि हाणामारीही झाली होती. काही दिवसांपूर्वीच आरोपींनी अभिनवर चाकूने हल्ला केला होता. अभिनचा गेम करण्याची तयारी होती. मात्र, तो वाचला. याघटनेनंतर कशिशला भीती होती की, अभिनव त्याचा कधीही ‘गेम’ करू शकतो. त्यामुळे अभिनवचा काटा काढण्याची योजना आखली. अभिनव गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे. अलिकडे तो गुन्हेगारी जगतातून माघार घेण्याच्या प्रयत्नात होता. तो मेयो रूग्णालयाजवळ एकाहॉटेलमध्ये काम करीत होता.
रात्रपाळीत काम करून तो घरी आला. बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास बारसेनगरातील सविता पाटील यांच्या चहा टपरीवर निवांतपणे चहा पित बसला होता. ही संधी साधून मारेकºयांनी त्याला घेरले आणि चाकूने पोट, छाती, गळा, हात आणि पायावर सपासप वार करून सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पाचपावली पोलिस घटना स्थळावर पोहोचले. पंचनामा करून अभिनवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. वृत्त लिहेपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.