मुंबई:- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक संपली आहे. आता पुढील बैठक तामिळनाडूत होणार आहे. आजच्या बैठकीच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी इंडिया आघाडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यावेळी तीन ठरावही मंजूर करण्यात आले आहे. भाजपने विरोधकांना नमवण्यासाठी घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला आहे. तर भाजपच्या घराणेशाहीच्या मुद्द्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या नाकीनऊ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या घराणेशाही विरोधात मित्र परिवारवादाचा नारा दिला आहे. आम्ही एक एक पाऊल पुढे येत आहोत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या विरोधकात घबराट निर्माण झाली आहे. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. आम्ही सर्व देशप्रेमी आहोत. आम्ही अलान्सचं नाव इंडिया घेतलं आहे. त्यामुळे आमचे विरोधक कोण आहेतहे तुम्हाला समजलं असेलच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.