भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विदर्भासह राज्याच्या विविध भागात रविवारपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे विदर्भात कापूस आणि फळबागांना फटका बसला आहे. सोमवारी नागपूर दौºयावर असलेल्या फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी शेतकºयांना आश्वस्थ केले. ते म्हणाले आम्ही सर्व जिल्हाधिकाºयांना पीक हानी बाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. शासनाच्या धोरणानुसार शेतकºयांना मदत केली जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीवर बोलण्यास फडणवीस यांनी नकार दिला. महायुतीचे जागा वाटप अंतिम झाले नाही. २६/ २२ हा जागावाटपाचा आधार असेल. पण तीनही पक्षाच्या चर्चेच्या वेळी तो बदलू शकतो, असे फडणवीस म्हणाले.