भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकºयांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरात बाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकºयांना पैसे देताना हात आखडता घेते. नुकसानग्रस्त शेतकºयांनाकॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प असून भरीव मदत जाहीर केली पाहिजे. शेतकºयांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल व निर्ढावलेल्या सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. गांधीभवन येथे प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व सदस्य अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोअर कमिटीच्या बैठकीत दुष्काळ, शेतकºयांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई यासह जनतेला भेडसावणाºया ज्वलंत प्रश्नावर गंभीर चर्चा झाली. विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह इतर नेते नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौºयावर असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते पण त्यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे पण भाजपा सरकार त्यांना मदत देत नाही. याआधीसरकारने जाहीर केलेली मदत शेतकºयाांपर्यंत पोहचलेली नाही. काँग्रेस पक्ष शेतकºयांना मदत मिळवून देण्यासाठी विधानसभेत व रस्त्यावर उतरून जाब विचारेल. लाखो तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहे, टढरउ स्पर्धा परिक्षेची तयारी लाखो विद्यार्थी करत आहेत पण सरकार नोकर भरती जाहीर करत नाही. राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. सरकारने तातडीने नोकर भरती जाहीर करावी. आरोग्याचा प्रश्नही गंभीर असून राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरोग्याचा कायदा करावा.