पुन्हा अवकाळी पावसाने धानपिकाचे नुकसान

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : तालुक्यातील सिल्ली परिसरात पुन्हा मंगळवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकºयांच्या शेतात कापून ठेवलेल्या कडपा पाण्याखाली आल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सिल्ली परिसरातील धान पीक शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली असून हाती आलेले पीक पाण्यात भिजताना पाहून अनेक शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले.

सिल्ली शेतशिवारातील पावसाळी धान पीक नुकतेच कापणीला आले असून अनेक शेतकºयांनी धान कापणी करून शेतातच धानाच्या कडपा ठेवल्या होत्या, मात्र पुन्हा अचानक आलेल्या पावसाने धानाच्या कडपा पावसात भिजल्यामुळे धानपिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय अधिकांश शेतकºयांची धान पीक कापणी सुरू असून धानाची खुबीशेतात आहे. मात्र पुन्हा मंगळवारला आलेल्या आवकाळी पावसाने शेतकºयांच्या हातात आलेले पीक पावसात खराब झाल्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने धानपिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *