चारित्र्यावर संशय घेत भावाकडुन बहिनीचा खून

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात भावाने बहिनीचा गळा दाबला आणि त्यातच बहिनीचा मृत्यू झाल्याची घटना वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भंडारा तालुक्यातील ग्राम सोनुली येथे रविवारी रात्री घडली. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी वरठी पोलिसांनी गुन्हा नोंद करीत आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली आहे. ग्राम सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हान ला कार्यक्रमा निमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघेच घरी होते. दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हाणल्या. तो एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातहीशुकशुकाट होता.

दरम्यान पोलीस पाटील यांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठूनमृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *