वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम बजेट सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सहावा अर्थसंकल्प सभागृहात मांडत आहेत. मोरारजी देसाईंनंतर सीतारामन या दुसºया अर्थमंत्री आहेत, ज्यांना सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. ‘देशाला नवा उद्देश आणि नवी आशा मिळाली. जनतेने पुन्हा मोठ्या जनादेशाने सरकारला निवडून दिले.