भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. उन्हाळा लागला कि पाणी टंचाईला सुरुवात होत असते. परंतु ती टंचाई करण्याचे काम आमचे नगरपरिषद करत असुन अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याचे माहिती मिळाल्यावर ही सुद्धा दुरुस्ती न करने, नगरपरिषद प्रशासन निद्रा अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असाच प्रकार पाण्याच्या ढोल्यासमोरील गांधी सागर गार्डन समोर मागील पंधरा दिवसापासुन मोठी पाईप लाईन लिकेज झाली असुन सुद्धा अजुन पर्यंत नगर परिषद प्रशासनाला माहित नाही असल्याचे समजते.
एवढा निद्रावस्थेत आमचा नगरपरिषद प्रशासन असुन लाखो लिटर पाणी रोज बर्बाद होत आहे. तर त्या लिकेजमुळे आजुबाजुच्या परिसरातील नळधारकांना पाणी बरोबर मिळत नाही. लिकेज असलेल्या ठिकठिकाणी पाईप लाईन मधून घाणपाणी जाऊन नळातुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी ताबडतोब नगरपरिषद प्रशासनाने दखल घेण्याची मागणी सकाळी फिरायला जाणाºया नागरिकांनी केली आहे.