पुरातून बस काढणे भोवले; ६ बस चालक निलंबीत

आर्वी : तालुक्यातील वर्धमनेरी येथे रविवार ४ रोजी पुलावरून पुराचे पाणी असतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत बसची वाहतूक करण्यात आली. धोकादायक प्रवास करणाºया ६ बस चालकांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिवहन महामंडळाला नोटीस बजावत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये आर्वी आगाराचे पाच चालक तर एक तळेगाव आगाराच्या चालकाचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवार ४ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत जोरदार पाऊस आल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. वर्धमनेरी येथील नाल्याला पूर आल्याने तेथील पुलावरून पाणी वाहत असल्याने आर्वी वर्धमनेरी मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असतानाही बस चालकांनी पाण्यातून बसची वाहतुक केली. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाºया चालकांवर जिल्हाधिकारी राहुल कडीर्ले यांनी कारवाईचे निर्देश दिले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाच्या विभागीय नियंत्रकांना नोटीस पाठवून कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांचे आदेश मिळताच विभागीय नियंत्रकांनी सहा चालकांना निलंबित केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *