विदर्भातील सुप्रसिद्ध चिंतनशील कवी, गझलकार किशोर मुगल यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वलगाव रोडवर चांगापूर येथे “मुगलसराय” या नवनिर्मित वास्तूत या दोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले. “नामालूम” या टोपण नावाने लिहिणाºया कवी किशोर मुगल या विलक्षण प्रतिभेच्या कवीच्या प्रेमापोटी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरून अनेक मातब्बर मंडळी हा समारंभ याची देही याची डोळा बघण्यासाठी अमरावतीला आली होती. त्यात प्रामुख्याने लेखक समीक्षक संजय येरणे, शिवराम भोंडेकर, डॉ.प्रमोद काकडे, नितीन देशमुख, सुनील यावलीकर, प्रदीप देशमुख, अनिल लडे, गजेंद्र हिंगणकर, प्रदीप देशमुख, दिवाकर देशमुख, चंद्रकांत जाधव, राजेश राजगडकर, यशवंत मोहिते, नरेश बोरीकर, अजय पडघन, डॉ.विशाल इंगोले, संजय वाटाणे,शारदा मोरे, डॉ.अरुण मानकर, भुपेश नेतनराव, ललीत कदम, पवन नालट, बाबूभाई पटेल, प्रकाश वाघमारे, पुनाराम निकुरे इत्यादी गझलकार,कवी, समीक्षक, लेखक, पत्रकार मंडळी नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, मुंबई, सुरत येथून आली होती. अतिशय साधेपणाने संपन्न झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे प्रभावी सूत्र संचालन वैभव भिवरकर यांनी केले. या प्रसंगी किशोर मुगल व्यक्ती आणि त्यांचा काव्यमय प्रवास तथा लेखन यावर अनेकांनी आपल्या मनोगतातून किशोर मुगल यांच्या स्वभाव आणि प्रतिभेचे गुणगौरव केले.

याप्रसंगी किशोर मुगल यांनी सांगितले की मला जसे वाटते तसे मी लिहितो, अकोल्याचे कवी प्रकाश मोरे यांनी गझल लेखनाचे धडे दिल्याने त्यांच्या इच्छेनुसार हिंदीगझल संग्रह प्रकाशित करताना आनंद होत असला तरी आज ते या जगात नाहीत याची सल मात्र कायम मनात राहील. मुगल यांचा शेर कहॉं अब किसी एक घर में रहे चलो उम्र भर बस् सफर में रहे. किनारे पे रहके बिखर जायेगी कश्ती से कह दो भवँर में रहे… कवी किशोर मुगल यांची आता एकूण ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यात “एक्कावन कविता माज्याही”, “कालिंदीच्या डोहात”, दिवस निरुत्तर येतो”, “बस युही”, “नामालूम” यांचा समावेश आहे. चांगापूरच्या पंचक्रोशीतील हिरव्यागार वातावरणात उभारलेल्या मुगलसराय या नवनिर्मित घराचे वास्तू, मुलगा निसर्ग याचा १८ वा वाढदिवस, पुस्तक प्रकाशन सोहळा आणि कवी संमेलन असे भरगच्च आयोजन होते. उपस्थितांना पुस्तके भेट देण्यात आली तर याप्रसंगी मुगलसराय या वास्तू निर्माण प्रक्रियेत ज्या कंत्राटदार,कामगारवर्गाचे परिश्रम लाभले त्यांच्या विषयी सामाजिक जाणिवा ठेवून यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच मंदाबाई मुगल (आई) नीता मुगल (पत्नी) यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आप्तस्वकीय मित्रमंडळी उपस्थित होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.