भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आज ०२ आॅक्टोंबर २०२२ रोज रविवारला भगिनी निवेदिता सभागृह येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व मंचावर डॉ बंडू चौधरी, प्रा धनंजय गिरहेपुंजे, प्रा सुरेश केदार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी आपले विद्यार्थी आपले वक्ते या उपक्रमात विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर त्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रभावी गोष्टी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा युवराज जांभूळकर, प्रास्ताविक डॉ बंडू चौधरी यांनी तर आभार प्रा राखी बावनकुळे यांनी मानले.