भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : प्लॉट च्या दुरूस्तीसाठी रितसर अर्ज करूनसुध्दा भंडारा भूमी अभिलेख कार्यालयातर्फे टाळाटाळ केली जात असल्याने तक्रारदार वसंता दादुजी पालटकर यांनी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील वसंता दादुजी पालटकर जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय भंडारा येथे त्यांच्या प्लॉट च्या दुरूस्तीसाठी रितसर अर्ज सादर केला होता.सदर अर्ज या कार्यालयाने तुमसर भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठविले.दरम्यान तुमसर येथील अधिकाºयांनी अर्जदाराला मौका चौकशी करीता हजर राहण्याचे पत्र दिले असता अर्जदारांनी ती प्रक्रियासुध्दा पुर्ण केली मात्र तरीसुध्दा तुमसर भूमी अभिलेख कार्यालयाने त्यावर निर्णय न देता टाळाटाळीची भूमीका घेतली. त्यामुळे अर्जदारांनी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असुन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमीका अर्जदार वंतस पालटकर यांनी घेतली आहे.