जरिपटका रेल्वे उड्डाण पुलाविरोधात महिलांचे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: नागपूर ते नवी दिल्ली रेल्वे मार्गावर जरीपटका येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलामुळे येथील नझुल वसाहतीमधील नागरिकांसमोर अडचणीचे डोंगर उभे झाले आहेत. पुलाचे काम थांबवून संरचनेत बदल करण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी बुधवारी जरिपटका येथे आंदोलन केले. पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे अतिशय संथ गतीने सुरू आहे. शिवाय या पुलामुळे नझुल वसाहतीमधील नागरिकांना मुख्य रस्त्यावर ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील ही समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे जरीपटका दलित कल्याण महिला मंडळाने त्याविरोधात आंदोलन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *