भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन शहर पोलिसांनी ते १६ मोबाईलधारक मूळ मालकांना परत केले. शहरातील राजेंद्र भेंडारकर, रिद्दी अग्रवाल, अमोल आग्रे, शैलेंद्र खोब्रागडे, ममता शेंडे, प्रतिमा भालाधरे, प्राची हटवार, योगेश खंडेलवाल, विशाल चौधरी, स्वप्नील असाटी, मनोज पंधराम, नुपूर पटले, राजेश्री बिसेन, खुशाल देशमुख, संतोष लांजेवार व यशवंतराव राऊत यांनी त्यांचे मोबाईल हरविल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करुन हरविलेले मोबाईल ताब्यात घेतले. तसेच संबंधितांकडून खातरजमा करुन त्यांना परत केले.