भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सध्या सणासुदीचे दिवस असून, या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या अधिक असते. पण रेल्वे विभागाने याच कालावधीत हावडामुंबई मार्गावरील दहा ते बारा दिवसांसाठी तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे विभागाने पुन्हा १७ रेल्वेगाड्या पुढील दहा ते बारा दिवस रद्द केल्या आहेत. यात रायपूर-डोंगरगढ रेल्वे २३ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत, डोंगरगढ-रायपूर ३ सप्टेंबरपर्यंत, इतवारी-बालाघाट २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, बालाघाट-इतवारी २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, कटंगी-गोंदिया २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, गोंदिया-कटंगी २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, गोंदिया-वडसा २३ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, वडसा-चांदाफोर्ट २५ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर, चांदाफोर्ट-गोंदिया २५ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर, रायपूर-डोंगरगढ २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, डोंगरगढ-गोंदिया २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, गोंदिया-रायपूर २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर, डोंगरगढ-रायपूर २६ आॅगस्ट, रायपूर-इतवारी २५ आॅगस्ट, इतवारी-रायपूर रेल्वे २६ आॅगस्ट रोजी रद्द राहणार आहे. कोरोनानंतर बिघडलेले रेल्वेचे वेळापत्रक अजूनही तसेच आहे. काही महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे रोको आंदोलन केले होते. याची दखल या क्षेत्राच्या खासदा- रांनाही घ्यावी लागली. खासदारांनी रेल्वे सु- रळीत धावतील, याकडे रेल्वेने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यावेळी केल्या होत्या. यासूचनेनुसार, चार-आठ दिवस रेल्वे सुरळीत धावू लागल्या. प्रवाशांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. अल्पावधीतच रेल्वे विभागाने आपले पूवीर्चे दिवस आणले. अजूनही तेच दिवस सुरूच आहेत.