मध्यरात्री तीन घरे जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील सातोना येथे उंदराने पळविलेल्या दिव्याची जळलेली वातीमुळे तीन घरे जळून भस्मसात झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. सातोना येथील शकुंतला कुवरलाल रहांगडाले यांचा लहान मुलगा मंतिमंद आहे. घटनेच्या दिवशी रात्री त्याचे संपूर्ण कुटूंब दवाखान्यात जाण्यापूर्वी घरात लहान मुलगा एकटाच राहणार असल्यामुळे तो प्रकाशात राहावा व त्याला त्रास होऊ नये, यासाठी तेलाचा दिवा लाऊन ठेवला होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास उंदिराने जळती वात उचलून इतरत्र टाकली. जळत्या वातीमुळे शकुंतला रहांगडाले यांच्या घराला आग लागली. याची झळ शेजारील राजेश्वर राहांगडाले व दिनेश्वर राहांगडाले यांच्या घरांनाही पोहोचली. यात तिघांचेही घर जळून खाक झाले. या घटनेत अंदाज अंदाजे १७ लाखांचा नुकसान झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *