भंडारा पत्रिका/वार्ताहर भंडारा : विवेकानंद ज्युनिअर कॉलेज अड्याळ येथे निरोप समारंभ कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून क.महाविद्यालयाचे प्राचार्य व्हि.एस.जगनाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मेंढे, प्रा. आजबले तर वर्ग ११ वी चे मार्गदर्शक म्हणून प्रा. सैंग कोहपरे हे होते. विशेष अतिथी म्हणून माजी विद्यार्थी व पत्रकार उदय चक्रधर तसेच, भंडारा जिल्हातून १९२१/२२ मध्ये प्रथम आलेली कु.आलिशा नान्हे, कु.दीपाली मांढरे, कू.आशिया खान हे उपस्थित होते. यावेळी उदय चक्रधर, कु. आलिशा नान्हे, कु.दीपाली मांढरे, कु.आशिया खान यांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ११ वी च्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण निरोपाची भाषणे दिली. व त्यांना उत्तर देतांना वर्ग १२ वीचे विद्यार्थ्यांनी भाऊक होऊन महाविद्यालयातिल व्याख्यात्यांनी त्यांना कसे घडवलं हे सांगितलं.
माजी विद्यार्थी उदय चक्रधर यांनी आपल्या प्रगतीत विवेकानंद ज्युनिअर कॉलेज अड्याळ चे खुपच जास्त योगदान आहे हे सांगितलं. कु.आलिशा नान्हे, कु. दीपाली मांढरे, कु.आलिशा नान्हे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.आजबले सर, प्रा. सैंग कोहपरे सर, प्रा. मेंढे सर व प्राचार्य जगनाडे सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ११ वी चा विद्यार्थी अभिषेक दिघोरे तर आभार प्रदर्शन कु.कोमल वझे यांनी केले. यावेळी विवेकानंद क. महाविद्यालयतिल शिक्षक शिक्षका शिक्षकेत्तर कर्मचारी, कातुर्लिचे सरपंच संगदिप देशपांडे तसेच वर्ग ११ व १२ वीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग ११ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रा. सैंग कोहपरे सरांच्या मार्गदर्शनाखाली खुप मेहनत घेतली.