यशवंत थोटे मोहाडी : आंबा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतो. आपल्या भंडारा जिल्हात व मोहाडी तालुक्यातील आपल्या सर्वांच्या शेतामध्ये आंबा असतो आणि साधारणपणे जानेवारी महिन्यात आंब्याला मोहर लागते. परंतु आंब्याचे मोहर हे मोठ्या प्रमाणात गळून जाते. त्यामुळे आपल्याला आंब्याचे कमी उत्पन्न मिळते. आंबा हा भारताचा फळ राजा आहे. आपल्या सर्वांना आंबा खूप आवडतो. रोजच्या आहारामध्ये फळांना खूपच महत्त्व आहे, प्रगत देशांपैकी आजही भारतामध्ये फळांचे आहारात कमी प्रमाण आहे. आंब्याची लागवड हे सर्वत्र केली जाते आणि बाजारामध्ये आंब्यांना खूपच मागणी असते. आंबा हा उन्हाळ्यामध्ये येणारा फळ आहे. परिपक्व फळांचा रंग, अतिशय चविष्ट,आणि उत्कृष्ट गोष्टी कथा या गुणांमुळे आंबा हा जगातील जगातील महत्त्वाच्या फळांपैकी एक आहे. पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर आल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरवातीस हजेरी लावल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी यावर्षी वाढल्याने याचा परिणाम आंबा फळपिकांवर होण्याची शक्यता आहे. आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन जून महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली. दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, त्यामुळे वातावरणात होणारा बदल यांचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.
साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरवात होते, मात्र यावर्षी पावसाने नोव्हेंबर -डिसेंबर जानेवारीपर्यंत हजेरी लावली असल्याने शेतकºयांची अवस्था नाजूक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरवात होऊन आंबापिकाला मोहोर येण्यास सुरवात होत असते. मात्र,यावर्षी नोव्हेंबरमध्ये पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहोर येण्याची शक्यता आहे. परिणामी आंबा हंगाम लांबणार आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंब्याला कलम केल्यामुळे अवघ्या तीन ते चार वर्षांमध्ये आंब्याला मोहर लागण्यास सुरुवात होते. कलमाच्या उघड्या बुंध्यावर बोडोर्पेस्ट लावावी. कलम केलेल्या बुडनचा खालच्या भागावर वेळोवेळी येणारी नवीन पालवी खुडून टाकावी. आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारे पिक आहे. कलम करून लावल्यावर पहिली दोन ते तीन वर्षे आंब्याला पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे कलम मरण्याचे प्रमाण कमी होते आणि कलमे पुढे चांगली वाढतात. कलम लावल्यावर पहिल्यावर्षी हिवाळ्यात आठवड्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात दोन वेळा पाणी द्यावे. दुसºया वर्षी हिवाळ्यात पंधरा दिवसांतून एकवेळ व उन्हाळ्यात आठवड्यास एक वेळ पाणी द्यावे. तिसºया वर्षी हिवाळ्यात महिन्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात महिन्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी कलमांच्या बुडन भवती आळे करावे. आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसºया तिसºया आठवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारीअखेरपर्यंत मोहर लागते. काही काही ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही मोहोर येतो. तुडतुडे, कोळी, मीजमाशी, पिठ्या ठेकूण किडी तसेच करपा, भुरी रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होत नाही. भुरी ह्या आंब्याच्या मोहोरावरील एक महत्वाचा बुरशी रोग आहे.
हा रोग व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोहोरावर शक्यतो एकाच वेळी दिसून येतो. या रोगामुळे मोहोराचा संपुर्ण देठावर, फुलांवर आणि लहान फळांवर यावर बुरशी दिसू लागते. यामुळे रोगग्रस्त फुले आणि लहान फळे गळून जातात.याचा फळधारणेवर खूप वाईट परिणाम होतो. या रोगाचा प्रसार वाºयामुळे होतो. आंब्याला मोहोर लागण्याच्या वेळी ढगाळ वातावरण आणि दमट हवामान असल्यास रोग मोठ्या प्रमाणावर वाढतो. तुडतुडे व भुरी रोग या दोघांच्या नियंत्रणासाठी औषधे फवारणी करून घ्या. करपा या रोगामुळे पानावर करपल्या सारखे डाग पडतात. तसेच यामुळे मोहोरावरती अनिष्ठ परिणाम होतो. फळांवर काळे डाग पडतात आणि त्यांची वाढ कोणते होते. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बागेत स्वच्छता राखावी. झाडावर ०.२५ टक्के कॉपर आॅक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम/१० लीटर पाण्यात) किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाचा (१:१:१००) फवारणी करावी. यामुळे करपा रोगाचा प्रमाण कमी होतो. तिसºया ते सहाव्या फवारणीच्या वेळी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास फळगळ कमी होवून फळाचा आकार वाढतो.
फळधारणा वाढविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी ठअअ २० ढढट या संजीवकाच्या दोन फवारण्या मोहोर फुलल्यावर तसेच फळधारणा होताना करून घ्याव्यात. फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर शक्य असल्यास झाडांना वारंवार पाणी देत राहावे त्यामुळे झाडाच्या फळाची फळगळ कमी होते आणि तसेच फळांची वाढ देखील होते. आंब्याला फळधारणेपासून पुढे ७५ ते ८० दिवसांनतर पाणी देवू नये.फळांना आकर्षक रंग येण्यासाठी तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) या विद्राव्य खताच्या एक टक्का तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी (१० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात) याची फवारणी ही फळांचा आकार हा घोटी,वाटाणा अगदी लहान असताना