भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : कुटुंबातील सर्व गाढ झोपेत असताना मध्यरात्री दरम्यान लांडग्यांनी घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत गोठ्यात बांधलेल्या ५ शेळ्या ठार केल्या तर एका शेळीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सदर घटना २५ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे उघडकीस आली. धीरज बाळकृष्ण घरडे, रा. ईटान असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, धीरज घरडे यांच्या घराशेजारील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे बांधली असायची.
घटनेच्या दिवशी शनिवारी मध्यरात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान सर्व गाढ झोपेत असताना अचानक धीरज घरडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर लांडग्यांच्या समूहाने हल्ला चढवित ५ शेळ्यांचा फडशा फाडला तर, एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, गोठ्यात बांधलेल्या गाईचा मोठ्याने हंबरण्याचा आवाज ऐकून धीरज घरडे यांना जाग आली. त्यांनी उठून बघितले असता गोठ्यात बांधलेल्या शेळ्या गोठ्यात नव्हत्या. त्यांनी आजूबाजूला बघितले असता एक प्राणी त्यांना शेताकडे दूर जाताना दिसला. दरम्यान, त्यांनी टॉर्च च्या प्रकाशात आजूबाजूला शोधाशोध केला असता त्यांना काही शेळ्या व त्यांचे अवशेष इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसले.
सकाळच्या सुमारास सदर घटनेची माहितीलाखांदूर वन विभागाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर वन विभागाचे वनरक्षक जी.डी. हत्ते यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या घटनेतील नुकसानग्रस्त धीरज घरडे यांच्या ५ शेळ्यांपैकी २ शेळ्या गाभण असल्याची माहिती पशुपालकाने दिली आहे. या घटनेमध्ये सदर पशुपालकाचे एकूण ६० हजाराचे नुकसान झाले असून पशुपालकासह गावकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 0
शेतीला जोळधंदा असलेला पशुपालन व्यवसाय झाला नेस्तनाबूत
अल्पभूधारक धीरज घरडे यांना केवळ मात्र १ ऐकर शेती असून शेतीला जोळधंदा म्हणून शेळी पालन हा त्यांचा व्यवसाय होता. मात्र, नुकत्याच झालेल्या घटनेमध्ये लांडग्यांच्या झुंडाने त्यांच्या कडे असलेल्या शेळ्यांचा सुकळा साफ केल्याने त्यांचा शेतीला जोळधंदा असलेला पशुपालन व्यवसाय हल्ली नेस्तनाबूत झाला आहे.