भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिलांद्री येथे ‘समता पर्व’ निमित्तानेडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे – (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) मार्फत निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक नयन गुरुदास खेकडे, द्वितीय क्रमांक कृतिका मुनेश्वर जांभूळकर तर तृतीय क्रमांक सृष्टी बालकदास रामटेके यांनी पटकाविला. निरीक्षक म्हणून बार्टीचे समतादूत सचिन नवघडे यांनी काम पाहिले. निबंध स्पर्धा मुख्याध्यापक आदे, सहायक शिक्षिका डोंगरे यांच्या उपस्थितीत पार पडली.