मतदानानंतर शाईऐवजी लेझरचा वापर करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीत होणा-या अवैध मतदानाला प्रतिबंध लावण्यासाठी निवडणूक आयोग आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. मतदानादरम्यान बोटांवर शाई लावण्याऐवजी आता लेझरचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, लेझरने केलेली खूण अनेक दिवस काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे तसेच इव्हीएममध्ये एक कॅमेराही बसवण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल.

या वर्षी होणा-या पाच राज्यांच्याविधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे बोगस मतदान थांबेल. कारण, लेझर स्पॉट केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आलीतर, त्याला पकडले जाईल. दुसरीकडे इव्हीएममध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख करून निवडणूक अधिका-याला अलर्ट पाठवेल. नवीन वर्षात १० राज्यांत विधानसभा निवडणुका होतील.

यामध्ये लोकसभेच्या १२२ जागांचा समावेश आहे. जे एकूण जागांच्या सुमारे २२ टक्के आहे. या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाला आठ अशा याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे, ज्याचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *