भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने ईडीकडून चौकशी केली असल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीर्चे जिल्हाध्यक्षनाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाºयांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणेचामोठ्या प्रमाणात गैरवापर करुन विरोधी पक्ष व लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत आहे.
असा उपयोग राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात झाला आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापराबद्दल निषेध आहे. सातत्याने केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत लोकशाहीत सक्षम विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात करतेय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीर्चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना ईडीचे नोटीस पाठवून हैराण करण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याचा यावेळी निषेधकरण्यात आला.