अहिल्याबाई होळकर यांनी राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले – समीर मस्के

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लोकमाता वीरांगना अहिल्याबाई होळकर यांनी धाडस, दूरदृष्टी, त्यागी आणि समर्पण वृत्ती या गुणांच्या आधारे प्रजेच्या हितासाठी लोक कल्याणकारी राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले असे प्रतिपादन कान्हाळगाव ग्रामपंचायतचे सरपंच समीर मस्के यांनी केले. ग्रामपंचायत कान्हाळगाव येथे लोकमाता वीरांगना अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकमाता वीरांगना अहिल्याबाई होळकर यांच्या प्रती मेस पुष्पांजली अर्पण व दिप प्रज्वलित करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी निता रामटेके तसेच चंदा हुमे यांना शाल, स्मृर्ती चिन्ह, प्रशस्ती पत्र तसेच रोख राशी प्रदान करून आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सरपंच समीर मस्के यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच वीरेंद्र भोवते,वैभव आरिकर, खेमलता लांजेवार, तनुजा खोब्रागडे, बेबीनंदा भोवते, कुसुम टेकाम, बायना भोवते, अशोक भोवते तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हेमराज भोवते तर आभार वीरेंद्र भोवते यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *