भंडारा पत्रिका/प्रतिनिध्ी अड्याळ :पवनी तालुक्यातील अड्याळ सीमावर्ती भागातील काल हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती यामुळे शेतक-यांनी तांदूळ पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी करायचे मात्र यंदा मृग नक्षत्र कोरडाच गेल्याने शेतक-यांच्या नजरा आभाळाकडे काही शेतकरी तर चक्क धुळपेरणी करून मोठ्या चिंतेत पडले होते सिंचनाचे सोय असलेले शेतकरी सुध्दा पेरणी करून पिकाला वाचविण्याच्या प्रयत्न करू लागले होते यंदा पावसाला कधी सुरूवात होणार या विवंचनेत शेतकरी होते अशातच अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी थोडाफार का होईना मात्र त्यांच्या चेह-यावर हास्य फुलले. दुस-याच दिवशी शेतकयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे चित्र अड्याळ परीसरात पाहायला मिळाले आहे.