सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणार तरी कोण- इंजि. नितिन धांडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील विनोबा नगर, गोवर्धन नगर परिसर ठिकानी पावसाचे पाणी साचलेले असून तिथे दलदल असलेली चिखल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याने कच्चे रस्ते चालन्या लायक नाही कीचडा पासुन वाढलेले अपघात, डुकरांचा हैदोस व सांडपाण्यामुळे परिसर दुर्गंधयुक्त झालेला आहे. तरी त्या ठिकाणी योग्य प्रमाणात भरण टाकून तो भाग उंच करावा ज्यामुळे तेथे पाणी साचनार नाही, डासाची पैदास थांबेल. आलेला पाऊस, साचलेले पाणी, कच्चे रस्ते, विल्हेवाटीसाठी तुंबलेल्या नाल्या, तुटलेल्या नाल्या इत्यादी सर्वांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

साचलेल्या पाण्यामध्ये तयार होणाºया डासांच्या प्रादुर्भावाने डेंगू, मलेरिया यासारखे आजार डोके वर काढताना दिसत आहेत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कुठल्याही उपाय योजने शिवाय व नियोजन शून्य, ढसाळ प्रशासन सर्वांच्या जीवाशी खेळताना दिसतो आहे. दिवसागणिक डुकरांच्या वावराने देखीलपरिसरातील शहरातील नागरिक असुरक्षित असून इतर आजारांच्या सावटात सर्वसाधारण नागरिक जगत आहेत. प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन या सर्व समस्यावर तोडगा काढावा. कच्चे रोड वर मुरूमाच भरण, पायल्यांचि व्यवस्था, खाली प्लाट वरील कच्ची नाली करुण पाणि काढने, नियमित जंतूनाशक फवारणी, डुकरांचा बंदोबस्त, नाली बांधणी, पक्के रस्ते बांधणी, पथदीवे व पाण्याची विल्हेवाट इत्यादी लवकरात लवकर करणे अत्यंत गरजेचे आहे तरी ते लवकरात लवकर अमलात आणावे. अशी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने मागणी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *