१० वी, १२ वीच्या पुर्नपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे जुलै, आॅगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील प्रथम वर्ष पदविका, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. पुर्नपरीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. त्यांना संस्थास्तरावर होणार असलेल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. संस्थेकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर तयार केली जाणारआहे. संस्थेने ठरवलेल्या वेळापत्रका नुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांशी संपर्क साधावा लागणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *