भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- शहरातून जाणाºया उड्डाण पुलात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे दुरूस्तीकरिता उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करून खालून वळविण्याची शक्यता असल्याने ठिकठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आलेले आहेत. वाजवीपेक्षा उंची अधिक असल्याने दुचाकीच्या अपघातात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) चे चौपदरिकरण झाल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जात असल्याने अनेक अपघात होऊन काहींना कायमचे अपंगत्व आले. तर काहींना आपला जीव गमवावा लागल्यामुळे शहरातून उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली होती.
तत्कालीन आमदार राजेश(बाळा) काशीवार यांचे प्रयत्नाने तत्कालीन राजमार्ग व बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केसलवाडा/फाटा ते स्मशानभूमी लाखनी पर्यंत अंदाजे अडीच किलोमीटर उड्डाण पुलाचे जेएमसी कंपनीद्वारा बांधकाम करण्यात आले. वाहतूक सुरू झाल्यानंतर काही पिल्लर वरून वाहने जातांना कर्णकर्कश आवाज येऊ लागल्याने तांत्रिक दोष असल्याचे बांधकाम कंपनीचे निदर्शनास असल्याने काही काळ उड्डाण पुल वाहतुकीस बंद करून तांत्रिक दोष निवारण करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही. सध्याही तीच परिस्थिती असल्यामुळे उड्डाण पूल वाहतुकीस बंद करून वाहतूक उड्डाण पुलाखालून वळविण्यासाठी ठिकठिकाणी ओबडधोबड गतिरोधक निर्माण करण्यात आल्याने गतिरोधकावरून दुचाकी जातांना किरकोळ अपघात किंवा दुचाकी चालकांना कमरेचा त्रास होत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. योग्य रीतीने गतीरोधकाचे काम करावे अशी मागणी होत आहे.