भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर आणि मोहाडी तालुक्यासह संपूर्ण भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील मुख्य पीक धानाचे उत्पादन मुख्यत्व शेतकरी घेत असून राज्याचे सिंचन धोरणाकडे होणाºया दुर्लक्षितपणा चा फटक्यामुळे सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकºयांना घ्यावे लागत आहे. एकच पीक उत्पन्नाच्या भरोशावर तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून असताना ऐन धान पिकाची कापनी हंगामात मागील दोन दिवसापासून अवकाळी झालेला पाऊसामुळे, शेतात कापून ठेवलेले धान, आणि कापणीसाठी शेतातील उभे असलेले पिकाची मोठ्या प्रमाणात पाणी साचून जवळपास ८० टक्के नुकसान झाले आहे. आकस्मिक पाऊस आल्याने मोहाडी, आणि तुमसर तालुक्यातील सम्पूर्ण गावाचे धान पिकाचे नुकसान झाले .घरी खायला पण तांदूळ येईल ही पण अपेक्षा नाही.शासनाने आता थेट पावसाचे आणि वातावरणातील ओलसर पणा लक्षात घेऊन सरसकट कोणताही पंचनामा न करता, कोणतेही अर्ज न मागविता, थेट एकरी १५००० हजार नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून शेतकºयांना मदत करावी अन्यथा भारत राष्ट्र समिती तर्फे शेतकºयांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा भारत राष्ट्र समिती पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे.