अवकाळीने शेतकºयांच्या धान पिकाचे नुकसान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिल्ली : भंडारा तालुक्यातील सिल्ली परिसरात मंगळवारी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकºयांच्या शेतात कापणी करून ठेवलेला धानाचा कळपा, मळणीसाठी रचून ठेवलेला धानाचे पुंजके, खुल्या जागेत ठेवलेले बोºयातील धान तसेच हार्वेस्टरने मळणी करुन वाळण्यासाठी बाहेर ठेवलेले धान पावसात भिजल्याने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सिल्ली परिसरातील धान पीक शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली असून हाती आलेले पीक पाण्यात भिजताना पाहून अनेक शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले.

या अवकाळी पावसाचा खरिपातील धान पिकासह भाजीपाला, रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ‘निसर्ग जगू देत नाही व शासन मरू देत नाही’ अशा स्थितीत बळीराजा सापडला आहे. सिल्ली शेतशिवारातील पावसाळी धान पीक नुकतेच कापणीला आले असून अनेक शेतकºयांनी हार्वेस्टर मशीनच्या मदतीने धानाचे चुरणे करून धान वाळण्यासाठी खुल्या जागेवर ठेवले आहेत, तर काहींनी धानाची पोती राईस मिल मध्ये उघड्यावरच ठेवली आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने धानाची पोती पावसात भिजल्यामुळे धानपिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय अधिकांश शेतकºयांची धान पीक कापणी सुरू असून धानाचे पुंजके व धानाची खुबी शेतात आहे. मात्र अचानक आलेल्या आवकाळी पावसाने शेतकºयांच्या हातात आलेले पीक पावसात खराब झाल्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने धानपिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *