भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी तहसीलदार तुमसर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात शेतक-यांचे कापलेले धानपीक भिजून अंकुरित झाले आहे. धानाचे पुंजणेसुद्धा अंकुरित झाले आहे. हाती आलेले पीक नष्ट झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अशावेळी शासनाने पंचनामे न करता सरसकट भंडारा जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी तीस हजार रुपये आर्थिक मदत करावी, शेतकºयांचे ३० टक्के ई-पीक नोंदणी झालेली नाही त्यामुळे ई-पीक नोंदणीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरेंद्र रहांगडाले यांनी केली आहे.