जालना : अध्यादेशाचा कायदा होऊन मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. या कायद्यांतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळाल्यावर काय करायचे ते ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना या कायद्यचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्यासोयºयांना सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यत, हे आंदोलन सुरूच राहील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.