आजपासून बारावीची परीक्षा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- उद्या २१ फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे . कुठेही गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांपासून जबाबदारी देण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाºयावर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिलेत. परीक्षा केंद्राच्या नजीकचे झेरॉक्स सेंटर परीक्षेदरम्यान बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. सन २०२४ परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, परीक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही व अनावश्यक जमाव दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर १०० टक्के बंदी घालावी. त्यामुळे यावषीर्ची परीक्षा ही भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात होईल या दृष्टीने सर्वांनी नियोजन करावे. मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, संस्था प्रतिनिधी यांनी गैरप्रकाराला कोणत्याही प्रकारे समर्थन देवू नये, तसे आढळल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *